Thursday, June 4, 2009

कधी तू माझ्याशी बोलशील?

आज अचानक तुझा एस.एम.एस. आला नि ओसाड वाळवंटात वसंत फुलावा तसे झाले. तुझ्याकडून असे घडेल याची अपेक्षाच जणू मी सोडून दिली होती. तीन दिवस झाले अन्न गोड लागत नव्हते, खाल्लेच जात नव्हते. आज दुपारी खूप दिवसानंतर जेवण करतोय की काय असे वाटले. याबद्दल शतश: धन्यवाद. मनाची तगमग थोडी शांत झाली. परमेश्वर फार दयाळू आहे, असे आमचे संत सांगतात. तो तुझ्यापेक्षा वेगळा नसावा याचा प्रत्यय आला.
काही वेळा मनात नसताना एखाद्याशी बोलावे लागते तर काही वेळा मनात असूनही एखाद्याला बोलता येत नाही. किती परस्परविरोधी घटना आहेत ना या. असो.
तुझे रुटीन चांगले चालू असेलच. नारायणच्या नावाने तू अनेक वेळा शिव्या घालायचीस, त्यापेक्षा जास्त पटीने शिव्या मला घातल्या असणार. मला राग येतो माझा स्वत:चा नि तुझाही, तू का एवढी चांगली मैत्री माझ्याशी केलीस की मला खरे बोलावे लागले.
संध्याकाळी 7 वाजले की, हात मोबाईल कडे जातोच. कधी कधी तर उगाचच रिंगटोन वाजल्याचा भास होतो. कारण एक विशिष्ट रिंगटोन तुझ्या कॉलसाठी सेट केले आहे. चुकून कुठे ते गाणे जरी वाजले तरी मन कासावीस होते. नेहमी तूझा गोड आवाज कानात घुमतो, तू माझ्याशी बोलत आहेस, काहीतरी सांगत आहेस किंवा भांडत आहेस असे वाटते.
पण, काय माहीत कधी तू माझ्याशी बोलशील??

No comments:

Post a Comment